आम्ही सोबत! मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, जयंत पाटलांनी शिवाजी पार्क मैदाना गाजवलं

साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे.मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 11T210245.499

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या (Mumbai) पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र आल्यानंतर शिवतीर्थवर पहिली जाहीर सभा झाली. या सभेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण केले. या भाषणाचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्याचबरोबर गद्दार आणि सत्ताधाऱ्यांचे दलाल म्हणून शिंदे भाजपला टोलाही लगावला आहे.

जयंत पाटील यावेळी म्हणाले, आजपर्यंत मी उत्तम भाषण कधी ऐकलं नव्हतं एवढं सुंदर भाषण आदित्य ठाकरे यांचं ऐकलं. उद्धवजी तुम्ही थोडे लेट आलात. मुंबई काय आहे, मुंबईची नस काय आहे. काय करायचं आहे याची ज्याला जाण आहे असे आदित्य ठाकरे मी पाहिले. उद्धवजी तुम्ही आता महाराष्ट्र पाहा, मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवून द्या. एवढे ते तयार झाले आहेत असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

मी 20 वर्षानंतर युती अन् उद्धवसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?, राज ठाकरे काय म्हणाले?

जयंत पाटील यावेळी म्हणाले की मागचं पोस्टर पाहिलं तर दिसतं भावकी एक आहे. मुंबईत फिरलो. तेव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा मुंबईकरांना आनंद झालेला पाहिलं. राज्यातील कानाकोपऱ्यातील लोकही पाहत आहेत. तुम्ही दोघं आलात. एकत्रित आलात, त्याबद्दल शरद पवार यांच्यावतीने मी तुमचं दोघांचं अभिनंदन करतो. पवार साहेब येणार होते. त्यांना जमलं नाही. त्यांनी मला यायला सांगितले असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, येथून आम्ही नेहमी बाळासाहेबांचं भाषण टेलिव्हिजनवर पाहायचो. तेच मैदान आहे, तिच शिवसेना आहे. पण शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत. काही दिल्लीचे गुलाम आहेत. या सर्वांना मुंबईकर खड्यासारखं बाहेर केल्याशिवाय राहणार नाही. याच शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेची पहिली सभा झाली. शरद पवार यांनी इथल्या कट्ट्यावर बसून त्यांचं भाषण ऐकलं. दोघांचे पक्ष वेगळे होते. पण बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत असंही ते म्हणाले.

साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे. कालपरवा अण्णामलाई आले. मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुंबईला तोडण्याचा उद्योग सुरू झाला आहे. वेगवेगळ्या राज्यातील लोकं मुंबईत येत आहे. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री आला असेल. सर्वांना बोलावण्याचं काम सुरू आहे. पण राज आणि उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहात. तुम्हाला आमची साथ आहे. मला खात्री आहे की मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us